Talathi Recruitment 2023 तलाठी भरती प्रक्रिया ४९९७ जागेसाठी पुढील महिनात सुरु होणार
1. पेसा क्षेत्रात सर्वच तलाठी पदे ही अनुसूचित जमाती या प्रवर्गातून भरावयाची असा राज्यापालांचा यापूर्वीचा
आदेश होता. त्यानुसार राज्यातील तब्बल ११ जिल्हे हे पेसा क्षेत्रात येत असल्याने या सर्व जिल्ह्यात सरसकटपणे
अनुसूचित जमाती (एस.टी.) या प्रवर्गातूनच शासकीय विभागातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, शिक्षक अशी विविध पदांची भरती करण्यात येणार होती. परंतु, अनेक जिल्ह्यांत आदिवासींसह इतरही प्रवर्गाची लोकसंख्या असल्याने हा त्या लोकसंख्येवर अन्याय होता. त्याविरोधात तीव्र आक्षेप नोंदविण्यात आले. त्याचीच दखल घेत या निर्णयात बदल करण्याची मागणी झाल्यानंतर २०१९ साली राज्यपालांनी त्याबाबत अध्यादेशही दिले होते. यात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पदभरती करण्याबाबत अनुमती देण्यात आली. परंतु, त्याबाबत शासन आदेशाची प्रतीक्षा होती. त्यामुळे तलाठी भरतीची डिसेंबरपूर्वीच घोषणा होऊन अन् एप्रिलपर्यंत भरती पूर्ण करण्याची घोषणाही तांत्रिक कारणामुळे हवेतच विरली. 2. अखेर २०२३ मध्ये प्रक्रिया सुरू झाली. पेसाबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले. त्यात बिंदू नामावलीसह इतरही
काही दुरुस्त्या आहेत का? बिंदू नामावली प्रमाणे रिक्त पदे किती? रिक्त पदांमध्ये आदिवासी आणि बिगर
आदिवासी यांचे प्रमाण किती याची संपूर्ण माहिती विभागीय आयुक्तांकडून मागविण्यात आली होती.. 3. त्यांच्याकडून अहवाल येणे प्रलंबित असल्यानेच भरतीबाबत घोषणा करूनही ती तत्काळ करणे शासनाला शक्य झाले नव्हते. ही रखडून पडलेली भरती आता नुकताच शासन निर्णय जाहीर झाल्याने लवकरच जात प्रवर्गानुसार तलाठी पदांची फेर संख्या निश्चित करून भरती पूर्ण करण्याचे सूतोवाच शासनाकडून करण्यात आले आहे... त्यामुळे तलाठीसह १७ संवर्गाच्या भरतीचा प्रश्न निकाली निघाला आहे.
आदिवासी लोकसंख्येनुसार अशी होणार पदभरती
• ५० टक्क्यापेक्षा अधिक एस. टी. प्रवर्गातूनच १०० टक्के तलाठी पदे भरणार
• २५ ते ५० टक्क्या दरम्यान आदिवासी लोकसंख्येसाठी ५० टक्के पदाची संधी • २५ टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या असल्यास: २५ टक्के पदे भरणार जागा वाढणार प्रमाणानुसार ही पदे भरली जातील.
• एस. टी. प्रवर्गाची लोकसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यात सर्वसाधारणसह एस. सी. ओबीसी व इतर घटकांच्या जागा वाढतील.
राज्यातील 36 जिल्ह्यात सुमारे साडेचार हजाराहून अधिक तलाठ्यांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी राज्यातील 11 आदिवासी जिल्ह्यातील पेसा क्षेत्राची कोणती लोकसंख्या धरायची याची बिंदू नामावली काढण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शन मागविले आहे. त्यामुळे
तलाठी पदांची भरती लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात 36 जिल्हे असून, महसूल विभागानुसार कामकाज सुरू असते. याच महसूल विभागांतर्गत अगदी गावपातळीवर तलाठी यांच्यामार्फत सर्व कारभार सुरू असतो. मात्र, राज्यात सुमारे 4 हजार 600 हून अधिक तलाठ्यांची पदे रिक्त आहेत.